सामान्यांना भेटला वाली ; खा.सोनवणेंच्या जनता दरबारातून खणखणले अधिकाऱ्यांचे फोन !


पवनसुत निवासस्थानी भरवला जनता दरबार, सर्वाधिक तक्रारी महावितरण विभागाच्या

बीड : प्रतिनिधी

शासकिय कार्यालयात चकरा मारूनही काम होत नाही.ज्यांची कोणी दखलही घेत नाही, अशा गरजवंतांना खा.बजरंग सोनवणेंच्या रूपाने वाली भेटला आहे.रविवारी खा.बजरंग सोनवणे यांनी पवनसुत निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन केले होते.पहिल्याच जनता दरबारात नागरिकांच्या रांगा लागल्या.यावेळी अडलेली आणि राजकीय द्वेषातून अडवलेली कामे मार्गी लावण्यासाठी जनता दरबारातून अधिकाऱ्यांचे फोन खणखणले.

खा.बजरंग सोनवणे यांनी निवडून आल्यानंतर प्रशासकिय पातळीवर महामॅरोथॉन बैठका घेवून प्रलंबित कामांचा आढावा घेतला. रेल्वेसारख्या महत्वाच्या प्रश्नावर शपथ घेण्याआधी बैठक घेवून या प्रकल्पाची काय स्थिती आहे,हे जाणून घेतले.यानंतर त्यांनी दिल्लीत जाऊन शपथ घेतली. दरम्यान,आता दिल्लीतून परतल्यानंतर विविध तालुक्यांच्या ठिकाणी जाऊन अधिकाऱ्यांकडून आढावा घेतला जात आहे.शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांचा मेळावा आटपून ते रात्री उशीरा केजमध्ये पोहचले. यानंतर त्यांनी सुर्योदय होण्याच्या वेळीच आज जनता दरबार असल्याचे केजमध्ये कळविले.सकाळी ९ वाजता जनता दरबारला सुरूवात झाली. तर सायंकाळी ४.३० पर्यंत हा जनता दरबार सुरू होता. यावेळी नागरिकांनी आपले प्रश्न घेवून अक्षरश: रांग लावली होती.यात महावितरणकडून अडवणूक होत असल्याचे गाऱ्हाणे सर्वाधिक नागरिकांचे होते.त्याच बरोबर पिण्याच्या पाण्याचे प्रश्न आणि शाळांसाठी येणाऱ्या अडचणीही नागरिकांनी मांडल्या.

Advertisement

खा.बजरंग सोनवणे यांनी प्रश्न घेवून आलेल्या नागरिकांचे जागीच समाधान करण्याचा प्रयत्न केला. रविवारची सुट्टी असतानाही संबधित अधिकाऱ्यांना फोन लावून दोन दिवसात कामे मार्गी लावण्याच्या सुचना दिल्या. शिवाय आलेल्या सर्वांचे निवेदने स्विकारून संबधित अधिकाऱ्यांना हे निवेदन कार्यवाहीस्तव पाठविण्याची व्यवस्थाही केली. यावेळी जिल्हा पोलीस अधिक्षक, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बीड, उप अभियंता महावितरण धारूर, कार्यकारी अभियंता सार्वजनीक बांधकाम विभाग आष्टी विभाग २ या अधिकाऱ्यांशी फोनवरून चर्चा केली.

००

पवनसुत निवासस्थानी जनता दरबाराचे आयोजन केले होते.या दरम्यान,हजारो नागरिकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न केला.कित्येकांचे प्रलंबित प्रश्न तात्काळ साडवले. हा जनता दरबार कायम सुरू राहिल. लोकांच्या सेवेत २४ तास काम करण्याचा निश्चय मी केला आहे. नागरिकांच्या प्रश्नांचे होणारे निराकरण माझ्या जनसेवेची सगळ्यात मोठी शिदोरी आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!